पुनरूजीवन ही वाड्:मय क्षेत्रातील ऐतिहासिक गोष्ट
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे पुनरूजीवन ही वाड्:मय क्षेत्रातील ऐतिहासिक गोष्ट आहे. ज्यांच्या खांद्यावर भवितव्य आहे. त्या बालकांसह कुमारांना सशक्त करणे काळाची गरज आहे. पालकांनी मुलांच्या खांद्यावर अपेक्षांचे ओझे लादले आहे. शाळा, शिकवणी, गृहपाठ आदीमुळे मुलांचे खेळ आणि अवांतर वाचन इतिहासजमा होत आहे. अशा कठीण परिस्थितीत मुलांचे बालपण आनंददायी ठेवण्यासाठी बाल साहित्य संस्थांना बालसाहित्याचे व्यासपीठ अग्निकुंडासारखे धगधगते ठेवावे लागणार आहे. प्रत्येक सोसायटीत ग्रंथालय आणि बाल दालन असले पाहिजे. या मागणीसाठी साहित्य संस्थांना चवळव उभी करावी लागणार आहे. चांगले बालसाहित्य प्रकाशित होत आहे. ते मुलांपर्यंत पोहचले पाहिजे.
प्रा. मिलिंद जोशी